मलिक अंबर कोण होता?


मलिक अंबर म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला एक कुशल योद्धा 

मलिक अंबर ने महाराष्ट्र ला भरभरून दिले, इतके दिले की विचारू नका.पण सहसा महाराष्ट्रात त्याची आठवण काढली जात नाही.दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. एक हबशी गुलाम म्हणून भारतात येउन पोचलेला पुढे थेट अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ झाला.मालोजी आणि विठोजी यांना निझाम ने जुन्नर ची वतन दिले ते मलिक अंबर च्या शिफारशीनंतर. त्या काळात आदिलशाही व निजामशाहित मोठी भांडणे निर्माण होऊ लागली.सुपे परगणा मालोजी राजेंना भेटला ते तिथेच राहू लागले.निजामशहा मेला व त्याचे सरदार मलिक अंबर व राजू मिआन यांच्यात गादी साठी संघर्ष होऊ लागला.मालोजीराजे मलिक अंबरच्या बाजूने जातील अस वाटल्याने मिआन राजुने मालोजी राजे यांची इंदापूर येथील गडीत हत्या करण्यात आली .त्यावेळी त्यांचे पुत्र शहाजीराजे केवळ 5 वर्षाचे होते,विठोजीराजेंनी जहागिरीचा संभाळ केला व 1611 ला त्यांचा मृत्यू झाला त्यांनतर ती जबाबदारी शहाजीराजेंवर आली.त्यावेळी शहाजीराजे केवळ 12 वर्षाचे होते.त्यानंतर मलिक अंबर ने त्यांची पाठराखण केली.

27 वर्षाच्या मराठ्यांच्या स्वातंत्र संग्रामनचे आपल्या कौन कौतुक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1680 ते 1707 मध्ये संभाजी महाराज, संताजी ,धनाजी ,राजाराम महाराज, ताराबाई,आणि कित्येकांनी झुंज देऊन मुघलांना लांब ठेवले पण हे आपण करू शकतो हा विश्वास कदाचित मलिक अंबर मुळेच आला असेल कारण १५० मराठा स्वार घेऊन निजामशाही वाढवली मलिक अंबर ने , शाहाजी महाराज आणि त्यावेळचे अनेक मराठा लोकांना घेऊन निजामशाही वाढवली ती मलिक अंबर ने . एकाच वेळी शाहजहान च्या मुघल आणि इब्राहिमशः आदिलशाही यांनी एकत्र केलेला हल्ला थोपवालाच नाही तर त्या दोन शाह्यांना पराभूत केले.

अल्लाउद्दीन खिलजीच्या क्रूर कहाण्या जनतेला दाखवण्याऐवजी जर मलिक अंबरच्या इतिहासाचं अर्ध पानंही जरी इतिहासात वाचून दाखवलं तर एक वेगळा चित्र निर्माण होईल... या मलिक अंबर चा हिंदूंनी दुस्वास केला कारण तो मुस्लिम म्हणून आणि मुस्लिमांना पण नाकारले करण तो मूळचा अबसैनिया चा (त्याचाच अपभ्रंश हबशी असा होत असे, सध्या त्याला एथोपिया) अस पण म्हणतात मधील गुलाम.नंतर काही काळ मलीक अंबर हे गुलाम होते सउदी अरब येथे, नंतर त्यांनी बगदाद ला विकले मीर कासीम याने.पुढे त्याला निजमशाहीकडे विकायला आणण्यात आलं, पण निजामाने त्याला विकत घ्यायला नकार दिला. शेवटी त्याला हशमांनी इथेच टाकून निघून गेले. 10 वर्षांचा असलेला मलिक अंबर सुरुवातीला छोट्या चोऱ्यामाऱ्या करून मोठा झाला नंतर त्याने सैन्य जमवलं, सुरुवातीला काही काळकरिता भाडोत्री पद्धतीने अणे लोकांना युद्धात मदत केली. अहमदनगर च्या एका सरदाराने चंगेज खान(मध्य आशिया मधील नव्हे) त्यांना अहमदनगर वाढवले.त्या सरदारांनी मलीक अंबर यास पुढे आपला वारसदार घोषीत केले. पण एवढा पराक्रमी त्यामुळे तो निजामशाहीचा सेनापती झाला.

अनेक मुस्लिम सत्ताधारी नुसार हा मलिक अंबर आजिबात नव्हता मलिक अंबर ज्यान उभ्या आयुष्यात फक्त एकाच महिलेशी लग्न केलं आणि तो आयुष्यभर तिच्याच बरोबर राहिला त्याच्या जनानखान्यात एकही दासी नव्हती, मलिक अंबर हा स्त्रियांचा पराकोटीचा आदर करायचा अगदी छत्रपतींइतका.

नगर मधील " लकडी महल " हे त्यांचे निवासस्थान उतरत्या वयात 72 व्या वर्षी मोगलांशी झुंज देताना शहिद झाले.

आयुष्यभराचा ससेहोलपट ची धडा घेऊन त्यांनी सैन्यात सगळ्या जातीधर्माला सोबत घेतलं, पायाला तोडा, बसायला घोडा आणि ढालभर रुपय्या ही त्याची पद्धत लोकांना भावी आणि त्यांनी मराठी माणसाचे सैन्य उभा केले,

1)गनिमीकावा शहाजी महाराजांना मलिक अंबर नेच शिकवला पण नंतर शिष्य एवढा हुशार झाला की विचारू त्यामुळे मलिक अंबर शहाजी महाराजा वर जळत होता याची परिणीती शहाजी महाराजांनी निझाम शाही सोडण्यात झाली.ते थेट परत आले ते मलिक अंबर च्या मृत्यूनंतर.जसे शिवाजी महाराजांचे नाव देशात अफझलखान मुळे प्रसिद्ध झाले तसे शहाजी महाराजांचे नाव भातवडीच्या युद्धाने देशात प्रसिद्ध झाले होते.

2)आजचे शिवाजी महाराज आपले दैवेत आहे ते पण मलिक अंबर मुळे.शहाजी महाराज (मालोजी भोसले यांचे सुपुत्र)आणि जिजाबाई(लखुजी जाधवयांची कन्या) या साठी त्यांनी मध्यस्थी केली होती.निझाम शाही वाचवायची असेल तर या दोन मराठा खानदानात सुमधुर संबंध व्हायला हवे होते हे मलिक अंबर ने ओळखले.

3)दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. आपण नेहमी ताराबाई ला मानतो की तिच्या नेतृत्वाखाली मराठयानी प्रथमच नर्मदा ओलांडली (नेमाजी शिंदे आणि खंडेराव दाभाडे नि नर्मदा ओलांडली) आणि उत्तरेत धुमाकूळ घातला तर ते चुकीचे आहे.मलिक अंबर च्या नेतृत्वाने निजामशाही मधील अनेक मराठयानी १६२० ला मध्य प्रदेश मध्ये उत्तरेत थैमान घातले.

मलिक अंबर & त्याचे 60000 मराठी सैन्य ने गनिमी काव्याचे सर्वाना प्रशिक्षण देऊन मांडू पर्यन्त धडक मारून मुगलांना चांगलेच धुवून काढले सर्वात आधी मराठे मलिक अंबर सोबत मालव्यात घुसले 1619-20त्यानंतर नेमाजी शिंदे ने औरंगजेबाच्या काळात नर्मदा पार केली

4)आजची औरंगाबाद ही देणगी मलिक अंबर ची.मलिक अंबर ने खडकी शहर वसवले पुढे त्याचे रूपांतर औरंगझेब च्या नावाखाली औरंगाबाद झाले .औरंगाबादला एक मोठं महानगर वसवलं, तटबंदी उभारली, पाण्यासाठी नहर ए अंबर बांधली. मलिक अंबर ने शहराच्या जलव्यवस्थापनाची योग्य काळजी घेतली,त्या करिता हर्सूल तलाव,अंबरी तलाव(सलीम अली) ह्यांची निर्मिती केली

5)डोक्यावरून मैला वाहण्याची पद्धत आणि वेठबिगारी हे त्याने सगळ्यात पहिल्यांदा बंद केलं(स्वतः गुलाम असल्यामुळे त्याला याची कणव आली असावी) .

6)जमीन मापण्याची दशमान पद्धत ही त्यानेच विकसित केलेली पद्धत.त्या पद्धतीचा उपयोग अजून ही होत असे.मुघल आदिलशाही कुतुबशाही टिपू अश्या अनेक सत्ताधारिकांनी या पद्धदतीच वापर केला.

7)शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांना त्यानेच निजामशाहीत आणलं आणि वतन दिलं, आज औरंगाबाद बसस्टँड परिसर हा मालोजीपुरा म्हणून ओळखला जातो तो त्यांनी त्यांच्या नावाने वसवलेला पुरा.

8) ब्राह्मणांसाठी मलिक अंबरने स्वतंत्र पंडित खाणे सुरू केले होते.

9)असं म्हणतात कि भारतात खापरी नलाद्वारे पाणीपुरवठा पध्दत ही मलिक अंबरनेच आणली. दुरवरुन पाणी आणुन साठवण्याची ही पध्दत दुष्काली भागात ही त्याने यशस्वीपणे वापरली.

निजामशाही दोन, पहिली अहमदनगरची 15 व्या शतकातील आणि दुसरी हैद्राबाद ची 17 व्या शतकातील.

नगरच्या निजामशाही मूळ मराठी ब्राम्हण मलिक अहमद- हा अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचा मूळ पुरुष होता. याचा आजोबा बहिरंभट नांवाचा ब्राह्मण असून तो गोदावरीच्या उत्तरेस विदर्भातील पाथरी नांवाच्या शहराचा देशपांडे होता. एक दुष्काळांत याचा आजोबा आपल्या तिमाजी नांवाच्या मुलास घेऊन विजयानगराकडे गेला. बहामनी सुलतान अहमदशहा वली याच्या सैनिकांनी विजयानगरच्या स्वारींत तिमाजीस कैद केले व गुलाम म्हणून आणलें. त्याला मुस्लिम बनवून मलिकनायन नांव ठेवलं पुढें सुलतान महंमद यानें काम बघून बढती दिली आणि निजाम-उल्मुल्क ही पदवी देऊन तेलंगणा च्या प्रांतावर त्याची नेमणूककेली . परंतु निजामउल्मुल्कनें मलिक अहमद नांवाच्या आपल्या मुलास नेमणुकीच्या जागीं पाठविलें, व आपण स्वत: सुलतानाच्या दरबारींच राहिला. येथें त्यानें खानेजहानविरुद्ध कारस्थान रचून सुलतानाच्या आदेशानुसार त्याचा हत्या केली व आपण स्वत: कारभारी झाला. यानंतरचा सुलतान जो महंमदशहा याच्या कालखंडात निजामउल्मुल्कनें आपल्या अगोदरच मोठ्या असलेल्या जहागिरींत बीड व मराठवाड्यामधील कित्येक जिल्ह्यांची भर टाकली व आपल्या मुलास तेलंगणाच्या सुभेदारीवरून परत बोलावून त्याची दौलताबाद सुभ्यावर नेमणूक केली. निजामउल्मुल्काचा खून झाल्यानंतर त्याचा मुलगा मलिक अहमद यानें बंड करून तो स्वतंत्र झाला सन 1489 ला , व स्वत:स निजामशाहा ही पदवी त्यानें लावून घेतली. तीच पुढें अहमदनगरच्या सर्व राजांनीं लाविली व त्यांच्या राज्यास यामुळएंच निजामशाही असें नांव पडलें. शिवाय मूळ पुरुष बहिरंभट याच्या स्मरणार्थ या वंशांतील प्रत्येक शहा आपल्याला बहिरी अशी पदवी लावून घेत असे.

ही त्याची खुलदाबाद ला असलेली समाधी !


एकेकाळी गुलाम असलेला, पुढे निजामशाहीचा पडता डोलारा सांभाळणारा, सामान्य जनतेला सुखावह शासनपद्धती सुरू करणारा मलिक अंबर!

मलिक अंबर हा एक ऍबेसिनिअन(हबशी, सिद्दी) १५४६ च्या असपास बगदाद येथे जन्मला. तिथे त्याला मीर कासीम नावाच्या व्यापाऱ्याने विकत घेतले आणि पुढे अहमदनगर येथील चेंगीजखान नावाच्या निजामशाही सरदाराला विकले.

पुढे तो निजामशाहीत १५० स्वरांचा नायक झाला. दरम्यान आदिलशाहीला जाऊन मिळाला. तेथे त्याला हीन वागणूक मिळल्यामुळे पुन्हा १५९४ मध्ये निजामशाहीत परतला. त्यांनतर त्याच्या साहसी वृत्तीमुळे चांदबीबीने त्याला आपल्या पक्षात करून घेतले.

निजामशाहीत चाललेल्या अनागोंदीचा फायदा घेऊन मुघल सम्राट अकबर ने अहदनगर वर हल्ला केला. त्यावेळी मलिक अंबर चांदबीबीबरोबर शौर्याने लढला. याच धामधूकीत चांदबीबीचा खून झाला. त्यानंतर बुऱ्हाण निजामशहा चा नातू बहादूर व पुढे त्याचा भाऊ बुऱ्हाण हा निजामशाही गादीवर बसला. या बुऱ्हाण ला गादीवर बसविण्यात मलिक अंबर ने मदत केली होती.

वर उल्लेख केल्याप्रमाणे अकबराने १५९५ साली अहमदनगर ला वेढा घातला आणि अहमदनगर जिंकून घेतले. पुढे मलिक अंबर ने मराठा सरदारांच्या गनिमी कावा या युद्ध पद्धतीने मुघलांना डोंगराळ प्रदेशात खेचून त्रस्त करण्यास सुरुवात केली. गनिमी काव्याचा मोठ्या प्रमाणात वापर शिवाजी महाराजांच्या आधी मलिक अंबर याने केला होता! मलिक अंबरच्या या सतत च्या हल्ल्यांना कंटाळून पुढे ७-८ वर्षांनी मुघलांनी मलिक अंबर शी तह केला.

मोगलांशी तह झाल्यावर मलिक अंबर ने स्वतःचे लक्ष प्रजेकडे दिले. सतत च्या युद्धामुळे प्रजेची ससेहोलपट झाली होती. महसूल गोळा होण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. पर्यायाने राज्यात आर्थिक तंगी येऊ लागली होती. या अडचणींना तोंड देण्यासाठी मलिक अंबर ने जमिनीची मोजणी करून घेतली. जमिनीचे बागायती व जिरायती असे दोन भाग करून घेतले. जमिनीच्या उत्पन्नाचा २/५ भाग धान्यरूपाने कर म्हणून घेण्यास सुरुवात केली. मागील कित्येक वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढून प्रत्येक शेतावर सरकारचे नक्त देणे ठरविले आणि ते देणे पण कमीजास्त येणाऱ्या पिकांच्या मनाने कमीजास्त देण्याची सवलत ठरवली. लोकांना नवीन जमिनी लागवडी खाली आणण्यास प्रोत्साहन देऊन त्या जनिमीवर काही वर्षे सारामाफी दिली. मलिक अंबर ने केलेल्या या सुधारणांमुळे तत्कालीन निजामशाही रयत सुखी झाली होती.

यावेळी निजामशाही २ मोठ्या सरदारांमुळे टिकून राहिली होती.

१. मलिक अंबर २. मियां राजू.

यातील मिया राजू फारच खालच्या दर्जाचा असल्यामुळे त्याकडील सरदार मलिक अंबराला येऊन मिळाले आणि इ.स. १६०२ मध्ये मलिक अंबरने मिया राजू वर चाल करून त्याचा नांदेड येथे पराभव केला. आणि त्याला व मुतृझा निजामशहा ला दौलताबाद किल्ल्यावर कैदेत ठेवले.

यानंतर मलिक अंबर ने मोगलांनी जिंकलेले निजामशाहीचे प्रदेश पुन्हा जिंकण्यास सुरवात केली. पुढे मोगलांचेही बरेच प्रदेश अंबरने जिंकले.

इ.स. १६०९ साली मुघल बादशाह जहांगीर ने खानजहान लोदीला अंबरविरुद्ध पाठविले. अंबराचा विजय झाला.

इ.स. १६११ मध्ये पुन्हा मुघलांनी मलिक अंबर विरुद्ध स्वारी केली. त्यातही मलिक अंबर चा विजय झाला.

सततच्या या पराभवामुळे मुघल बादशाह जहांगीर फार चिडला आणि स्वतः दक्षिणेत यायला निघाला. त्यावेळी पराभूत खानजहान ने त्याला थांबविले आणि स्वतः परत दक्षिणेत आला. यावेळी मात्र त्याने मलिक अंबर विरुद्ध थेट न जाता अंबरच्या लखुजी जाधवराव सारख्या अंबरच्या सरदारांना आपल्या बाजूला करून घेतले आणि त्याच्यावर हल्ला केला. ही लढाई १६१२ रोजी सुरू झाली पुढे ५ वर्ष चालली. यात मात्र मलिक अंबराचा पराभव झाला.

इ.स. १६२४ मध्ये मुघल आणि आदिलशाही फौजांनी एकत्रितपणे निजामशाहीवर हल्ला केला. या युद्धास भातवडीची लढाई म्हणतात. निजामशाही कडून या युद्धाचे नेतृत्व मलिक अंबर याने केले होते. त्याच्याबरोबर शहाजीराजे, शरीफजीराजे, खेळोजी भोसले वगैरे मंडळी होती. या युद्धात मालिक अंबराचा विजय झाला.

"शके १५४६ रक्ताक्षी संवत्सरे कार्तिक मासी भातवडीस मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महमद येसी दोन कटके मलिक अंबरे बुडविली."

युद्धानंतर लगेचच मलिक अंबर ने कमकुवत झालेल्या आदिलशाहीचा बराच प्रदेश उध्वस्त केला.

पुढे १० मे १६२६ रोजी वृद्धापकाळाने मलिक अंबराचा खुल्दाबाद येथे मृत्यू झाला.

  • मलिक अंबरने त्याच्या काळात जातीभेद केला नाही. त्याने अनेक मंदिरांना कायमची इनामे देऊ केली होती.
  • मलिक अंबरने निजामशाही रयतेची चांगल्या प्रकारे काळजी घेतली.
  • मलिक अंबरने सर्वप्रथम गनिमी काव्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
  • मलिक अंबरने जुन्नर शहराची भरभराट केली. आजही त्याचा वाडा जुन्नर शहरात आहे.
  • मलिक अंबरने खडकी हे शहर वसविले. ज्याला आपण आज औरंगाबाद म्हणतो.

संदर्भ :-

  • इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १
  • जेधे शकावली
  • शिवभारत
  • जहांगीरनामा

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास