Posts

Showing posts from July, 2020

कृषि वर्ष या फसली वर्ष

कृषि वर्ष या फसली वर्ष :- कृषि वर्ष से अभिप्राय उस वर्ष से है जो 1जुलाई से प्रारंभ होकर 30 जून को समाप्त होती है ।कृषि वर्ष को फसली वर्ष भी कहते हैं।अकबर ने  शासन संभालते ही अनुभव किया कि कोई ऐसा साल (संवत्) हो जो फसल और ऋतुओं से मिलता हो एवं हिजरी साल की तरह ,चंद्र मास की तरह न घटे और हिंदू के विक्रम संवत् से अच्छा हो ।उसने 1555 ई.में ऐसे साल की  शुरुआत की और मनमाने तौर पर फसली 963,जो उसके सिंहासनारूढ़ का हिजरी वर्ष था।उस वर्ष को फसली वर्ष कहा।तब से सभी राजस्व कागजात में यही फसली वर्ष चला आ रहा है।हर एक राज्य् का फसली वर्ष वहाँ की जलवायु के अनुसार शुरू होता है।उत्तर प्रदेश में यह 1जुलाई से प्रारंभ 30 जून को समाप्त होता है ।अंग्रेज़ी वर्ष में से 592(जुलाई से दिसंबर) या 593(जनवरी से जून) घटाकर फसली वर्ष या  साल ज्ञात करते हैं।जैसे 1  अक्टूबर 1994 को कौन से फसली   साल या वर्ष होंगी?   1994–592=1402 फसली वर्ष। 2.1मई 1995 को    फसली वर्ष होगा? 1995–593=1402 फसली वर्ष।

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारलेलं असतानासुद्धा शहाजीराजे स्वराज्यात न येता बंगलोरमध्येच का थांबले होते?

Image
जयराम पिंड्ये या कवीनेे तर म्हटले होते की, ‘‘इत साहजु है; उत साहजहॉं’’ पृथ्वीचे रक्षण दक्षिणेत शहाजी आणि उत्तरेत शहाजहान करीत आहे. 1630 शहाजी महाराज 1660 शिवाजी महाराज आणि 1688 संभाजी महाराज नी गाजवले. शहाजी महाराजांचे गणना त्या काळात भारतातली सर्वोत्तम सेनापती मध्य असायचे. उत्तरेत शहाजहान, दक्षिणेत शहाजी असा शहाजी महाराजांचा नाव भारतात उल्लेखाने घ्यायचे.मलिक अंबर च्या मुशीत तयार झालेले शहाई आपल्याच गुरूला भारी पडले होते.एकाचवेळी मलिक अंबर आणि शहाजी महाराजांनी आदिलशाही मुघालशही पराभूत केलेले. शहाजी महाराज स्वराज्यात का आले नाही ,बंगलोर का थांबले.याचा इतिहासात स्पष्ट उल्लेख नाही. पण तात्कालिक परिस्थिती बघता खालील कारणे असू शकती ल इतिहासात एक गोष्ट कमी लोकांना माहित आहे की शहाजहान ला शहाजी महाराजांनी आपल्या बापाच्या म्हणजे जहांगीर विरुद्ध बंडात शहाजहान ल मदत केलेली. त्यामुळे निजामशाहीत सोडल्यावर लगेच मुघलांनी त्यांना आपल्या पदरी घेतलेले. पण नंतर शहाजी महाराजांनी मुघालच्य आणि आदिलशाही विरुद्ध निझमचे बंद फसले. तेंव्हा मुघलांनी शहाजी महाराज ना आदिलशाही कडे नोकरीस मान्यता दिलेली आणि एक विशेष...

गडकरी म्हणतात, 'पाच हजार वर्षात एकही हिंदू राजाने मशीद पाडली नाही.' पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू धर्म अस्तित्वात होता का?

Image
हिंदू धर्म म्हणजे भारतातील विविध आणि प्रसंगी परस्परविरोधी अशा स्थानिक धर्मशास्त्र, रुढी, आध्यात्मिक संकल्पना आदिंचा अव्याहत प्रवाह. इष्ट देवतांत बदल झाला असेल, रुढी कालानुरूप बदलल्या असतील, किंबहुना बदलाव्याच; पण आठवणी आहेत, ती परंपरा, तो प्रवाह आजही आहे. गंगोत्रीही गंगाच आणि प्रयागीही गंगाच. आता चौदाशे वर्ष जुन्या इस्लामच्या मशिदी पाच हजार वर्षांपूर्वी होत्या की नाहीत ते ज्याने त्याने आपापली बुद्धिमत्ता वापरून पडताळून घ्यावे. असो. राहिला विषय हिंदू राजांनी मशिदी पाडण्याचा, तर छत्रपति शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय कवींद्र परमानंद कृत शिवभारत या ग्रंथातील १८व्या अध्यायातील ५२वा श्लोक असा आहे [1]  . त्वया गृहीत्वा कल्याणं तथा भीमापुरीमपि। यवनानाम् महासिद्धिनिलयाः किल पतिता:।। अर्थः कल्याण आणि भीमापुरी (भिवंडी) देखील घेऊन आपण यवनांच्या (मुसलमानांच्या) मशिदी जमिनदोस्त केल्या. आता महाराज हिंदू होते की आणखी काही हे पण ज्याचे त्याने ठरवा. टीप: "शिवभारत हा ब्राह्मणी/वैदिक/संघी कावा आहे" वगैरे असे कोणी म्हणणाच्या आधीच लिहितो - हा ग्रंथ महाराजांच्याच राज्यात, त्यांच्या हयातीत, त्यां...

पूर्व आफ्रिकेशी महाराष्ट्राचे संबंध पूर्वापार असल्याचे म्हटले जाते. त्याचे काही पुरावे सापडले आहेत का?

इतिहास प्रेमी असाल तर सिद्दी जौहर, सिद्दी मसूद ही नावे माहीतच असतील. तर हे सिद्दी म्हणजे आजच्या इथिओपिया, एरिट्रिया व इतर पूर्व आफ्रिकी देशातील लोक. त्यांना हबशी असे देखील म्हणतात. ७ व्या शतकात मुस्लीम आक्रमणासोबत हे लोक सर्व प्रथम भारतात आले. त्यानंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिश लोकांनी गुलाम म्हणून हबशी लोकांना भारतात विकण्यास सुरुवात केली. शरीराने काटक आणि मजबूत बांध्याच्या या लोकांना तत्कालीन (मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही) सैन्यात मोठी मागणी होती. यातील काही गुलाम आपल्या कर्तृत्वावर मोठ मोठ्या पदांपर्यंत पोहोचले, यातील एक विशेष नाव म्हणजे मलिक अंबर. मलिक अंबर हा अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता. खडकी येथे राजधानी केल्यावर मलिक अंबरने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. त्याने राबवलेल्या महसूल पद्धतींमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी झाला व वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. त्याने राबवलेली पाणीपुरवठा योजना, रस्तेबांधणी, इमारतींचे बां...

शिवाजी महाराजांनी गनिमी कावा अवलंबून स्वराज्य स्थापन केले. या पूर्वी गनिमी काव्याचा उपयोग अजून कोणी केला होता? आणि कधी?

Image
गनिमी कावा (Guerrilla Warfare) हे एक विशिष्ट प्रकारचे युद्धतंत्र आहे, ज्यात शत्रू गाफील असताना जलद गतीने हल्ला चढवला जातो आणि शत्रू सैन्य पूर्णपणे उभे होईपर्यंत जास्तीत जास्त नुकसान केले जाते. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. कारण गनिमी काव्यासाठी पोषक असलेला भूगोल दक्खन पठाराला लाभलेला आहे. परंतु शिवछत्रपतींना गनिमी काव्याचा उद्गाता म्हणता येणार नाही. शिवाजी महाराजांना गनिमी काव्याचं हे सूत्र त्यांचे वडील व गुरू दस्तुरखुद्द शहाजी महाराजांनी शिकवले, असे मत अनेक इतिहासकार व्यक्त करतात. शहाजी महाराजांनी देखील गनिमी कावा वापरून दक्खनच्या भूमीत पराक्रम गाजवला. अवघी निजामशाही स्वतःच्या खांद्यावर पेलून धरली. मोघल व आदिलशाहीस एकहाती झुंज दिली. पुढे आदिलशाहीत चाकरी पत्करल्याच्या नंतर देखील दक्षिणेत पराक्रम गाजवला. परंतु, शहाजीराजे देखील गनिमी काव्याचे उद्गाते नाहीत. गनिमी काव्याचे खरे उद्गाते हे महाराजसाहेब शहाजीराजेंचे लष्करी गुरू असलेले 'मलिक अंबर' आहेत. मलिक अंबर (१५४८-१६२७) मलिक अंबर चा जन्म (१५४८) आफ्रिकेतील इथियोपिया नावाच्या देशात झ...

शहाजी महाराजांनी कोणत्या शाहीतील लहान मुलाला पाठीवर घेऊन कारभार चालवला होता?

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वतःच्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.

निजामशाहीतील प्रसिद्ध राज्यकर्ती स्त्री चांदबीबी हिचा खून कोणी व कधी केला?

चांदबिबी हि हुसेन निजामशहा आणि खुनजा हुमायून यांची कन्या होती.कर्तबगार आईच्या पोटी जन्मलेली चांदबिबी पुढे राज्यकर्ती झाली. आईकडून तिनं राज्यकारभाराचे गुण घेतले होते. विजापूरची आदिलशाही व अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सत्ता संघर्ष होता. निजामशाही व आदिलशाहीमध्ये शांततेचा करार व्हावा, यासाठी चांदबिबीचा निकाह विजापुरच्या आदिलशहाशी लावला गेला. लग्नानंतर ती पतीला राज्यकारभारत मदत करू लागली. अली आदिलशहाच्या राज्यकारभारात अनेक छोटे मोठे टोळ्याचे संघर्ष सुरू होते. या टोळी जमातींच्या नायकाशी चांदबिबीने शांततेचे करार करत शांतता प्रस्थापित केली. अली आदिलशाह १५८०मध्ये वारला तिला. त्यांना मूल नव्हते. तिने भावाचा मुलगा इब्राहिमला दत्तक घेऊन राज्यकारभार चालवला. विजापूर दरबारात सरदारांची कटकारस्थाने सुरू होती, परिणामी तिला अटक करून सातारच्या किल्ल्यामध्ये कैद केलं गेलं. तरुण इब्राहिम शहा सिकंदर खानच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर त्यानं आई चांदबिबीला सातारच्या किल्ल्यातून सोडवून राज्याची जबाबदारी पुन्हा तिच्यावर सोपवली. इकडे विजापूरच्या दरबारात हबशी सरदार आणि दखनी सरदार यांच्यात भांडणे सुरू झाली होती. .इ. ...

मलिक अंबर कोण होता?

Image
मलिक अंबर म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला एक कुशल योद्धा  मलिक अंबर ने महाराष्ट्र ला भरभरून दिले, इतके दिले की विचारू नका.पण सहसा महाराष्ट्रात त्याची आठवण काढली जात नाही.दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. एक हबशी गुलाम म्हणून भारतात येउन पोचलेला पुढे थेट अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ झाला.मालोजी आणि विठोजी यांना निझाम ने जुन्नर ची वतन दिले ते मलिक अंबर च्या शिफारशीनंतर. त्या काळात आदिलशाही व निजामशाहित मोठी भांडणे निर्माण होऊ लागली.सुपे परगणा मालोजी राजेंना भेटला ते तिथेच राहू लागले.निजामशहा मेला व त्याचे सरदार मलिक अंबर व राजू मिआन यांच्यात गादी साठी संघर्ष होऊ लागला.मालोजीराजे मलिक अंबरच्या बाजूने जातील अस वाटल्याने मिआन राजुने मालोजी राजे यांची इंदापूर येथील गडीत हत्या करण्यात आली .त्यावेळी त्यांचे पुत्र शहाजीराजे केवळ 5 वर्षाचे होते,विठोजीराजेंनी जहागिरीचा संभाळ केला व 1611 ला त्यांचा मृत्यू झाला त्यांनतर ती जबाबदारी शहाजीराजेंवर आली.त्यावेळी शहाजीराजे केवळ 12 ...

निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

Image
मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले? देवगिरींच्या यादवांचा नाश झाल्यावर महाराष्ट्रात आणि भारतात काही काळ खिलजी आणि तुघलक घराणे यांची अधिसत्ता होती. ही अधिसत्ता १३४७ पर्यंत टिकली. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने दिल्लीच्या या दोन राजवटींचा विचार करायचा झाल्यास या दोन्ही राजवटी लोकाभिमुख होत्या असे म्हणता येणार नाही. या राजवटिंमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले असे म्हणावे लागेल. इ.स. १३४७ मधे दक्षिणेतील अमिरांनी बंड पुकारून आपल्यामधीलच एका सरदाराला (हसन गंगू) ला राज्यपद दिले. अशाप्रकारे बहमनीशाही(बम्मनशाही, ब्राह्मण शाही) साम्राज्याचा उदय झाला. बहमानींचे राज्य १३४७ पासून खऱ्या अर्थाने १४८२ पर्यंत टिकले. जवळपास सर्व दक्षिण देश बहमानींच्या अमलाखाली होता. बहमानींच्या जवळपास १५० वर्षांच्या कालखंडात असे स्थैर्य त्यांना कधीच लाभले नाही. बहमानींच्य काळात परदेशी आणि दक्षिणी मुसलमान यांच्यामधील संघर्षामुळे अनेक वेळा कधी परदेशी तर कधी दक्षिणी मुसलमान...

हैदराबादची निजाम राजवट

Image
  🌼हैदराबादची निजाम राजवट (१७२०-१९५६)🌼 __________________________________________ चित्र राज्यकर्ता नाव वैयक्तिक नाव जन्म कार्यकाळ मृत्यू निज़ाम - उल - मुल्क, आसफ जाह पहिला कमर उद्दीन खान, आसफ जाह पहिला ऑगस्ट २०   इ.स. १६७१ जुलै ३१ इ.स. १७२० – जून १   इ.स. १७४८ जून १ इ.स. १७४८ नासिर जंग मीर अहमद अली खान फेब्रुवारी २६   इ.स. १७१२ जून १   इ.स. १७४८  –  डिसेंबर १६ इ.स. १७५० डिसेंबर १६ इ.स. १७५० मुजफ्फर जंग मीर हिदायत मुहीउद्दीन साउदौला खान ? डिसेंबर १६ इ.स. १७५० –  फेब्रुवारी १३   इ.स. १७५१ फेब्रुवारी १३ इ.स. १७५१ सलाबत जंग मीर सईद मुहम्मद खान नोव्हेंबर २४   इ.स. १७१८ फेब्रुवारी १३   इ.स. १७५१  –  जुलै ८   इ.स. १७६२ सप्टेंबर १६ इ.स. १७६३ निज़ाम - उल - मुल्क, आसफ जाह दुसरा मीर निजाम अली खान मार्च ७ इ.स. १७३४ जुलै ८   इ.स. १७६२  –  ऑगस्ट ६ इ.स. १८०३ ऑगस्ट ६   इ.स. १८०३ सिकंदर जाह, आसफ जाह तिसरा मीर अकबर अली खान नोव्हेंबर ११   इ.स. १७६८ ऑगस्ट ६ इ.स. १८०३ –  मे २१ इ.स. १८२९ मे २१ इ.स. १८२९ नासि...