गडकरी म्हणतात, 'पाच हजार वर्षात एकही हिंदू राजाने मशीद पाडली नाही.' पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू धर्म अस्तित्वात होता का?

हिंदू धर्म म्हणजे भारतातील विविध आणि प्रसंगी परस्परविरोधी अशा स्थानिक धर्मशास्त्र, रुढी, आध्यात्मिक संकल्पना आदिंचा अव्याहत प्रवाह. इष्ट देवतांत बदल झाला असेल, रुढी कालानुरूप बदलल्या असतील, किंबहुना बदलाव्याच; पण आठवणी आहेत, ती परंपरा, तो प्रवाह आजही आहे. गंगोत्रीही गंगाच आणि प्रयागीही गंगाच. आता चौदाशे वर्ष जुन्या इस्लामच्या मशिदी पाच हजार वर्षांपूर्वी होत्या की नाहीत ते ज्याने त्याने आपापली बुद्धिमत्ता वापरून पडताळून घ्यावे.

असो.

राहिला विषय हिंदू राजांनी मशिदी पाडण्याचा, तर छत्रपति शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय कवींद्र परमानंद कृत शिवभारत या ग्रंथातील १८व्या अध्यायातील ५२वा श्लोक असा आहे[1] .

त्वया गृहीत्वा कल्याणं तथा भीमापुरीमपि। यवनानाम् महासिद्धिनिलयाः किल पतिता:।।

अर्थः कल्याण आणि भीमापुरी (भिवंडी) देखील घेऊन आपण यवनांच्या (मुसलमानांच्या) मशिदी जमिनदोस्त केल्या.

आता महाराज हिंदू होते की आणखी काही हे पण ज्याचे त्याने ठरवा.

टीप: "शिवभारत हा ब्राह्मणी/वैदिक/संघी कावा आहे" वगैरे असे कोणी म्हणणाच्या आधीच लिहितो - हा ग्रंथ महाराजांच्याच राज्यात, त्यांच्या हयातीत, त्यांच्याच विश्वासू कवीने लिहिला. आणि महाराजांना बहुदा संस्कृत भाषेचे ज्ञानही होते.

तळटीपा

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास