देवगिरींच्या यादवांचा नाश झाल्यावर महाराष्ट्रात आणि भारतात काही काळ खिलजी आणि तुघलक घराणे यांची अधिसत्ता होती. ही अधिसत्ता १३४७ पर्यंत टिकली. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने दिल्लीच्या या दोन राजवटींचा विचार करायचा झाल्यास या दोन्ही राजवटी लोकाभिमुख होत्या असे म्हणता येणार नाही. या राजवटिंमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले असे म्हणावे लागेल.

इ.स. १३४७ मधे दक्षिणेतील अमिरांनी बंड पुकारून आपल्यामधीलच एका सरदाराला (हसन गंगू) ला राज्यपद दिले. अशाप्रकारे बहमनीशाही(बम्मनशाही, ब्राह्मण शाही) साम्राज्याचा उदय झाला.

बहमानींचे राज्य १३४७ पासून खऱ्या अर्थाने १४८२ पर्यंत टिकले. जवळपास सर्व दक्षिण देश बहमानींच्या अमलाखाली होता. बहमानींच्या जवळपास १५० वर्षांच्या कालखंडात असे स्थैर्य त्यांना कधीच लाभले नाही. बहमानींच्य काळात परदेशी आणि दक्षिणी मुसलमान यांच्यामधील संघर्षामुळे अनेक वेळा कधी परदेशी तर कधी दक्षिणी मुसलमानांची अतिशय भयानक अशी कत्तल झाल्याचे आपल्याला आढळून येते. किंबहुना अशाच एका वादाने बहमानींचे साम्राज्य उर्जितावस्थेला आणणारा महमूद गावान याचा बळी पडला.

१४८१ साली महमूद गावान च्या झालेल्या खुनानंतर बहमनी साम्राज्याच्या विघटनास सुरवात झाली. पुढे साम्राज्याच्या ५ मोठ्या सरदारांनी स्वतःला बादशाह घोषित केले आणि बहमनी राज्याचे ५ तुकडे झाले.

मलिक अहमद निजामशहा - अहमदनगर(निजामशाही),

युसूफ आदिलखान - विजापूर(आदिलशाही),

फतेउल्लाह इमादशाह - वऱ्हाड(इमादशाही),

कासीम बेरीद- बीदर(बेरीदशाही),

कुली कुतुब उल मुल्क - गोवळकोंडा(कुतुबशाही).

अशाप्रकारे प्रश्नातील निजामशाही आणि आदिलशाही चा उदय झाला.


संदर्भ - गुलशन-ई-इब्राहीमी,

राजा शिवछत्रपती

धन्यवाद ।

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास