मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अब्दुल मुजफ्फर अल्लाद्दिन हसन बहमन शहा हा बहामनी सत्तेचा संस्थापक. त्याने राज्यकारभारास सुरुवात केली 1347 मध्ये. तो हसन गंगू या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.त्याला आणखी एक नाव आहे जफरखान असे .

त्याकाळात बहामनी साम्राज्याच्या सीमा लांब होत्या म्हणून त्यांनी त्याचे चार विभाग केले. गुलबर्गा दौलताबाद बेरार बीदर . आणि त्यांना एकेक आधिकरी नेमून दिलेला होता, आणि याच केलेल्या निर्णयाने पुढे घात झाला आणि पाच बहामनी सत्ता निर्माण झाल्या.

बहामनी साम्राज्य आणि विजयनगर हिंदू साम्राज्य च उदय एकाच काळात झाला . त्यामुळे त्यांच्यात संघर्ष साहजिकच होतं. पण विजयनगर कडून सतत मार खाणाऱ्या बहामनी साम्राज्य नें मात्रा शेवटच्या तलिकोट च लढाईत त्यांचं पाडाव केला.

1339 च भारताची नकाशा

इराणचा प्राचीन राजा बहमुन याचा तो वंशज, हे लोक झोरष्ट्रियान होते. त्यामुळे त्यांना बहमन शहा हे नाव मिळाले अशी आख्यायिका आहे. त्याने दिल्लीचा ता काळाचा सुलतान मुहंमद तुघलक याच्या सेनेचा पराभव केला.

तुघलक याची सत्ता दुबळी झाली आहे असे पाहून दक्षिणेतील अनेक यवनी सरदारांनी स्वतंत्रपणे सत्ता गाजवयाला सुरू केली . त्यांनी इस्माइल मख नावाच्या सरदाराने मुख्य बंडाळी केली त्यांची तर बंड मोडून काढण्यासाठी मुहंमद तुघलक मोठी फौज घेऊन औरंगाबाद जवळ त्याने इस्माइल मखचा दौलताबादजवळ पराभव केला. पण त्याला गुजरातेत बंड त्याच वेळी उद्भवल्यामुळे तिकडे जावे लागले. त्याची काही फौज दक्षिणेत l येथे राहिली. तेव्हा सरदार हसन गंगू याने त्या फौजेचा पराभव केला. तेव्हा इस्माइल मखने आपले पद सोडले आणि सर्व समतीने सरदारांनी हसन गंगूला सुलतान म्हणून निवडले. त्याने स्वत:ला दक्षिणेचा सुलतान म्हणून जाहीर केले आणि त्याची राजधानी गुलबर्गा येथे नेली. त्याने गुलबर्गा, कल्याणी, बिदर या क्षेत्रात राज्यविस्तार केला. बहमन शहाची सत्ता उत्तरेस मध्या प्रदेश क्या मंडूपर्यंत, दक्षिणेस रायचूरपर्यंत, पूर्वेला आंध्रात तट व पश्चिमेला दाभोळपर्यंत प्रस्थापित झाली होती. त्याने त्याच्या राज्याचा कारभारही व्यवस्थित लावून दिला.

पनवेल कल्याण वर लक्ष ठेवणारा प्रबळगड हा सुद्धा बहामनी शासकांनी बांधला

बहमन शहानंतर मृत्यूनंतर मुहम्मद शहा- पहिला सत्तेत आला (1357-1375). त्याने गोवळकोंडा च्या नायकाला ताब्यात घेतले त्याने कारभारास व्यवस्थित मांडणी केली. मुहम्मदानंतर मुजाहिद शहा, मुहम्मद शहा – दुसरा हे सत्ताधीश सत्तेत येऊन गेले. त्यानंतरचा फिरोजशहा बहामनी (1397-1422) हा महत्त्वाचा होय. फिरोजशहाने परकीय लोकांना दरबारात स्थान दिले. त्याचा अनेक भाषांचा अभ्यास होता. त्याला खगोलशास्त्रात विशेष रूची होती. त्याने दौलताबादजवळ वेधशाळा निर्माण करून, हिंदूंना मोठ्या प्रमाणात प्रशासनात जागा दिल्या. त्यानंतर अहमद शहा-प्रथम (1422-1426) सत्तेत आला. त्याने बहामनींची राजधानी गुलबर्ग्याहून बिदरला हलवली. त्यानंतर अल्लाद्दिन- दुसरा (1436-1458), हुमायुन (1457ते1461), निजाम शहा (1461-1463) , मुहम्मद शहा- तिसरा (1463 -1482), महमुद शहा (1482 ते 1518) यांनी कारभार हाकावला. इमादशही आणि निजामशाही चे संस्थापक मुख्यतः कन्नड ब्राम्हण आणि मराठी ब्राम्हण होता.

पण महमूद गवान या, सुलतानाच्या प्रधानमंत्र्याचा प्रशासनावर प्रभाव होता. त्याने साम्राज्याचा विस्तार करत असतानाच बिदरचा शैक्षणिक केंद्र म्हणून विकास केला. तसेच, इराक, इराण यांच्याशी सांस्कृतिक संबंध दृढ केले. पण त्याचा बळी दरबारातील सत्तास्पर्धेत गेला (1482). त्यानंतर बहामनी साम्राज्य पाच राज्यांत विभागले गेले (बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बेर/वऱ्हाडची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही ही ती पाच राज्ये होती).

बहामनी सात्ते विरुद्ध आणि विजयनगर मध्ये खूप वेळ संगर्ष झाला पण विजयनगर ने नेहमीच विजय मिळवला. विजयनगरचे बहामनी सर्ते ल सोडून द्यायची किंवा तह करून देण्याच्या पद्धतीने स्वतःचा नाश केला हा भाग वेगळा. (हीच चूक पृथ्वीराज चौहान ने केली होती).

असे पण म्हणतात की रामदेवराय जर कृष्णदेवराय सारखा हुशार आणि थंड डोक्याचा असता तर कदाचित भारताचा इतिहास वेगळा असता.

तिसरा मुहम्मद च्या काळात मोहम्मद गावानं सारखा हुशार माणूस ब्बहामनी का मिळाला.

बहमनींच्या दरबारात आता महमूद गावानशिवाय दुसरा कर्ता मुत्सद्दी उरला नव्हता. खुद्द सुलतान व राजमाता यांनादेखील ही जाणीव झाली. १४६६ मध्ये सुलतानाने एक फतवा काढून महमूद गावानला वकील-ए-सल्-तनत हे पद दिले व राज्याचे सर्वोच्च अधिकार त्याच्या स्वाधीन केले. या पदावर तो १४८१ म्हणजे मरेपर्यंत होता. नंतर महमूद खल्जीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला; परंतु खेडल्याच्या लढाईत बहमनी सेनापती मलिक युसूफ तुर्क याने माळव्याच्या सैन्याचा पराभव केला बहमनी आणि खल्जी यांच्यामध्ये कायम स्वरूपाचा तह झाला.

मोहम्मद गावानं हा सर्वात हुशार शासक होता आणि त्याची त्या काळात खूप मोठे ग्रंथालय आणि विद्यालय होते.त्याची कबर आज पण बीदर मध्ये दिमाखात उभी आहे.पण मोहम्मद गावानं सोडला तर बाकीच्या शासकांनी हिंदू चे दमन च केले.विजयनगरच्या पाडाव झाल्यावर या बहामनी सत्ताधाऱ्यांनी 4 लाख ते 5 लाख हिंदू(कन्नड भाषिकांचा) हत्याकांड घडावले. मोहम्मद गावानं हा सुसंकृत आणि हुशार अभ्यासक होता. त्याकाळात त्याचा इराण इराक आणि इतर दूरच्या सत्तेशी संपर्क असायचा.पण मोहम्मद तृतीय याने त्याचा खून केला.

मोहम्मद गावानं च बीदर मधील काही इमारती

गावानने लगतची हिंदू आणि मुसलमान राज्ये यांच्यात सामोपचाराचे धोरण ठेवून वातावरणात एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने पश्र्चिम किनारपट्टीकडे मोहीम काढून तो भाग मिळविला. खेळणा, संगमेश्र्वर, विशाळगड इ. ठाणी ताब्यात घेऊन त्याने बहमनींचा कोकणपट्टीवर अंमल बसविला. १ फेब्रुवारी १४७२ रोजी बहमनी फौजांनी गोव्याचा कब्जा घेतला. कोकणपट्टीवरील विजय आणि शेजारच्या हिंदु-मुसलमान राजांशी सीमातंट्याबाबत सलोख्याचे धोरण, यांमुळे बहमनी राज्याला एक निश्र्चित दिशा आणि स्वरूप प्राप्त झाले होते. महमूद गावानच्या खुनानंतर बहमनी सत्ता कमकुवत झाली. परदेशी अमीर राजधानीत राहण्यास नाराज होते. ते आपापल्या प्रदेशांत परत फिरले. त्यांपैकी काही युसूफ आदिलखानला मिळाले. मुहंमदशाहने हसन निजामुल्मुल्क याला मलिक-ए-नायब करून राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती दिली. अखेरच्या दिवसांत गावानच्या खुनाचा त्याला पश्र्चात्ताप झाला. दारूच्या व्यसनातच त्याचा अंत झाला. त्याचा अल्पवयीन मुलगा शिहाबुद्दीन महमूद (कार. १४८२—१५१८) गादीवर आला; पण प्रत्यक्षात सर्व सत्ता कासिम बरीद या मलिक-ए-नायबच्या हाती होती. राज्याभिषेकाच्या दिवशी दख्खनी मुसलमानांनी आदिलखानला मारण्याचा कट रचला. तो उघडकीस आला. त्यातूनच पुढे सु. एक महिना बीदरमध्ये अनागोंदी माजली.

आदिलखानने विजापूरला जाण्याचे मान्य केले; तथापि मलिक-ए-नायबची कारकीर्द फारशी सुखावह झाली नाही व त्याचा बीदरच्या अंबिसिनियन राज्यपालाकडून खून झाला (१४८६). यामुळे पुन्हा परदेशी मुसलमानांचे वर्चस्व दरबारात वाढले. त्यांनी सुलतानच्या खूनासाठी कट रचला; पण तो फसला. यानंतर महमूदशाहने राज्यकारभारातील लक्ष काढून घेतले आणि शासनाची सर्व जबाबदारी कासिम बरीद या तुर्की मुख्यमंत्र्यावर टाकली. तेव्हा प्रांतीय राज्यपालांनी त्यास विरोध केला. मलिक-ए-नायबचा मुलगा मलितक अहमद निजामुल्मुल्क याने दुहीचे बीज पेरले. महमूदशाह बहमनीने राज्यातील दुफळी मिटविण्याचा प्रयत्न केला. महमूदशाहनंतर दुसरा अहमद (कार. १५१८—२१), अलाउद्दीन (कार. १५२१—२२), बलिउल्ला (कार. १५२२—२५) व कलिमुल्ला (कार. १५२५—२७) हे चार सुलतान गादीवर आले; पण ते नामधारी होते आणि खरी सत्ता अमीर बरीदकडे होती. अखेर १५३८ मध्ये बरीदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही आणि या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.

बहामनी सत्तेचा अंत (विजयनगर चे हिंदू साम्राज्य संपवणाऱ्या या बहामनी च अंत पण एकमेकांमध्ये भांडून झाला).

1.आदील शही आणि 2. कुतुब शाही च अंत मुघळांकडून 1687 मध्ये झाला

3. इमादशही का निझाम शही ने 1574 मध्या संपवले

4. बरिदशही ला आदिलशाही ने 1619 ल संपवले.

5. निझाम शहीला 1630 च्या आसपास आदिलशाही आणि मुघलांनी संपवले.

गुलबर्गा ची जामा मशीद

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास